

जगभरातील शिक्षण व्यवस्थेत प्रचंड उलथापालथ होत आहे। पाटी, फळा आणि खडू या पारंपारीक साच्यातले शिक्षण कुचकामी ठरले आहे. संगणक, इंटरनेट, लॅपटॉप यांसारख्या अत्याधुनिक साधनसुविधांचा वापर करुन दर्जेदार शिक्षण उपलब्ध करण्याची गरज भासू लागली आहे. भारतानेही अशा "हायफाय एज्युकेशन'ची मुहुर्तमेढ रोवली आहे. अर्थात हे शिक्षण धनदांडग्यांच्या बाळांसाठीच उपलब्ध आहे. खेडोपाड्यात मोलमजुरी करणाऱ्या, शेतात राब राब राबणाऱ्या, रोजगार हमीच्या कामावर दगड फोडणाऱ्या गोरगरीबांच्या मुलांपर्यंत हे शिक्षण पोहचेल का ? ग्रामीण शिक्षणाची दयनीय स्थिती आहे. लहान मुलांना आपले अंग झाकायला कपडे नाहीत. पोटात चार घास नाहीत. वर्गांच्या खोल्यांना छप्पर नाही. अशा निष्पाप व गोरगरीब मुलांना "सॉफिस्टिकेटेड' वर्गातील शिक्षण मिळेल का ?
खरंच, यांचा कुणी विचार केलाय....?????
3 comments:
kharch paristhiti vidark aahe.
malaa vatatejar bharatat shikashn sudharale tar sagl kaahi vyavasthit hoil pan aapn yaa saglyalaa madatilaakuthun survaat karavi kalat nai aani tehi paradeshi astaanaa!
jar malaa tumhi suchavi shakal tar please sangaa.
आपण फारच चांगला विषय घेवुन बॉग सुरु केलेला आहात.
खरंच. तंत्रज्ञानाने संधी आणि आव्हाने दोन्ही निर्माण केली आहेत.
Post a Comment